मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला अमरसिंह देशमुख व अमोल बाबर रवाना

Admin
By -
0


 आटपाडीचा माण गंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा ताब्यात घेऊन सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची चार वाजता मुंबईत भेट घेण्याची ठरवले आहे खानापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांचे बंधू अमोल बाबर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत त्यासाठी ते आटपाडीतून रवाना झाले आहेत मुंबई येथे होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अमरसिंह देशमुख यांनी आटपाडी येथे झालेल्या सर्व पक्ष बैठकीत साखर कारखान्याला मदत करेल त्याच्या पाठीशी आपण या निवडणुकीत उभा राहणार असल्याचे जाहीर केले होते माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे अण्णांनी अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता त्या पद्धतीने राजेंद्र अण्णांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळपासून आटपाडी तालुक्यात जनसंपर्क दौरा सुरू केला आहे त्यांचे गावोगावी स्वागत केले जात आहे देशमुखांच्या बैठका सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला अमरसिंह देशमुख यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत साखर कारखान्या संदर्भात चर्चा झाली चार नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तोपर्यंत अमरसिंह देशमुख यांनी सर्व नेते मंडळी चर्चा करून राजेंद्र अण्णा देशमुख यांचा उमेदवारी अर्ज ठेवावा की पाठिंबा द्यावा या संदर्भात निर्णय घेण्यासाठी अमरसिंह देशमुख यांचे भेटीगाठी सुरू आहेत अमरसिंह देशमुख यांनी आपल्यालाच पाठिंबा द्यावा यासाठी युतीचे उमेदवार सुहास बाबर व महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील प्रयत्नशील आहेत राजेंद्र अण्णांची बंडखोरी थांबवावी यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत राजेंद्र अण्णा निवडणूक लढवणारच असे सांगत असल्यामुळे राजकीय सम्रावस्था निर्माण झाली आहे आमदारकी पेक्षा माणगंगा साखर कारखाना सुरू करणे तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे आहे अशी भूमिका घेऊन अमरसिंह देशमुख यांनी सर्वांची कान उघडणि केली आहे त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे 



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)